राजकीय

सरसंघचालक मोहन भागवत पुण्यातील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले घ्या जाणून..

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

पुणे : पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहजीवन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या सहजीवन व्याख्यानमाला कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली.

          यावेळी त्यांनी भारत विश्वगुरु व्हायला हवं, असं मत मांडलं. यावेळी त्यांनी जगातील विविध घटनांचं उदाहरण दिलं. “भारत विश्वगुरु झाला पाहिजे, असं आपल्या सगळ्यांना वाटतं. कारण आपण सगळे भारतीय आहोत. विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? पूर्वीपेक्षा आजचे जग फार सुखी आहे. जगाचा संबंध एकमेकांशी वाढलाय. विचाराने जग पुढे जातेय. जो कोणी आतापर्यंतचा जागाचा गुरु आहे त्याच्या मार्गदर्शनात सगळं ठीक चाललं आहे. सुख-सुविधा वाढल्या आहेत. पण मनुष्याजवळ सुख आहे का?”, असा सवाल मोहन भागवत यांनी केला.

        “सोयीसुविधा वाढली, पण शांती नाही. कोणीही गोळीबार करतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढले. युद्ध थांबत नाहीत. कुठे ना कुठे युद्ध सुरु आहे. कट्टरपणा कमी होत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. जमीन प्रदूषित झालीय. पाहिजे तेव्हा पाऊस येत नाही. येतो तेव्हा सगळं घेऊन जातो. हे आजच्या परिस्थितीचे वर्णन आहे.

           “जगात सगळे सुखी होऊ शकत नाही. जगात ४ टक्के लोक जगातील ८० टक्के संसाधन वापरतात. जगात हा नियम आहे. सगळ्यांचं चांगले होणार नाही. बलवान असतील त्यांच फक्त चांगलं होणार. जगात अस्तित्वासाठी संघर्ष सुरु आहे. मानव जात एकच आहे, असं म्हणायची चाल आहे”, असंही त्यांनी म्हटलं.

           ‘या जगात एक राक्षशी प्रवृत्ती…’

“खायला बकरीचे मास पाहिजे, तर बकरी पाळली पाहिजे. सायन्सच्या आधारवर सर्व सुरु आहे. ते देखील बदलत असतं. सायन्सचा फायदा ज्यांचा हाती साधनसंपत्ती होती त्यांनी घेतला. आज अशी स्तिथी आहे, एक बाजू उजळ आहे, मानव म्हणून गौरवशाली आहे. पण दुसरी बाजू पृथ्वीचा विनाश करणारी आहे. त्यामुळे लोक चिंतेत आहेत. या जगात एक राक्षशी प्रवृत्ती आहे तिला वाटत आम्ही म्हणू तस झालं पाहिजे. दुसरी प्रवृत्ती दैवी प्रवृत्ती आहे ती म्हणते आम्हाला जगू द्या, तुम्हीही जगा. जगाला गुरुची आवश्यकता आहे आणि तो भारत होऊ शकतो”, असं सरसंघचालकांनी सांगितले.

          “आपल्याला महासत्ता व्हायचं नाही. कारण महासत्ता झाल्यावर काय करतात लोक ते आपल्याला माहीत आहे. श्रीलंका भरतासोबत कशी वागली ते आपल्याला माहीत आहे. पण श्रीलंकेला पहिली मदत नेहमी भारताने केली. विश्वगुरु भारत झाला पाहिजे तर आपण काय करावं? या देशाची भक्ती आम्ही का करावी? असा प्रश्न तरुणांना पडत असेल”, असं मोहन भागवत म्हणाले.

            ‘आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र’

“भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी बंद होईल. आमचं राष्ट्र परोपकारासाठी तयार झालंय. इतरांच्या देवी दैवतांचे हाटाळणी करू नये. आम्ही सगळ्यांबरोबर मिळून मिसळून जगभरात राहतोय. राम मंदिर झालं पाहिजे असं हिंदूना वाटत होतं. पण असं झालं म्हणजे नेता होता येतं, असं नाही. आपला देश आता संविधानाने चालतो. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. इंग्रजांच्या कारस्थानामुळे पाकिस्तान निर्माण झालं. ज्याची त्याची पूजा ज्याला त्याला लक लाभो. पण नियम पाळले गेले पाहिजे. आपलं राष्ट्र इंग्रजांनी तयार केलेले नाही. आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र आहे”, असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??