आपला जिल्हाजालना जिल्हामहत्वाचे

जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले ; बाधित लोकांना अन्न धान्यासह जेवणाचीही केली सोय

पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडेंनी कलेक्टर व प्रशासनाचे केले अभिनंदन; जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले ; बाधित लोकांना अन्न धान्यासह जेवणाचीही केली सोय

पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडेंनी कलेक्टर व प्रशासनाचे केले अभिनंदन; जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष

जालना, दि.29 :जोरदार अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात सर्वत्र रेड अलर्ट जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत सात हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. पुरात सापडलेल्या लोकांना अन्न धान्यासह त्यांच्या जेवणाची देखील सोय केली. केवळ माणसानांच नाही तर शेतकऱ्यांच्या पशूधनाला देखील प्रशासनानेच वाचवले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी याबद्दल कलेक्टर व प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडून घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या आपत्तीत नागरिकांना त्रास होवू नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या भागात पाण्यामुळे धोका निर्माण झाला, त्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करुन त्यांच्या निवास, जेवणा व वैद्यकीय सोय करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

प्रशासनाची तातडीने मदत ; नागरिक व पशूधनाला सुरक्षित हलवले

गोदावरी नदीतून सुमारे 3 लाख क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आल्याने. जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि परतुर तालुक्यांतील गोदावरी नदीच्या काठावरील सुमारे 38 गावे बाधीत झाली आहेत. यामुळे बऱ्याचशा गावांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. परतूर, अंबड, घनसावंगी या तालूक्यातील सुमारे 7 हजाराहून अधिक नागरिकांना विविध गावांतून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आले असून, यातील 7 हजार 599 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाजमंदिरात केलेल्या निवास व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. 23 ठिकाणी अशा निवासव्यवस्था करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. अनेक शेतकर्यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करुन त्यांना चारा देण्यात येत आहे. कोणालाही इजा पोहोचू न देता नागरिकांची काळजी घेतल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 26 महसूल मंडळातील गावे बाधीत झाली असून, येथील नागरिकांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. काही भागात घरांची पडझड झाली असून शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पूरस्थिती ओसरल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. सध्या नागरिकांना शासनस्तरावरून तातडीची मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचेही मंत्री पंकजाताईंनी सांगितले.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??