विश्व… तुमचं.. आणि आभासी युग !

| विशेष लेख क्र.4 | दिनांक : 19 जुन, 2026 |
| विश्व… तुमचं.. आणि आभासी युग !
आपण तंत्रज्ञानाने विकासाचा नवा टप्पा गाठतोय ही अतिशय समाधानाची नव्हे तर आनंदाची बाब आहे. मात्र या साऱ्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तोटा देखील आहे. जसे नाण्याला दोन बाजू असतात तसच याबाबतीत देखील आहे. आलेला कृत्रिम बुद्धीमता आणि इतर समाज माध्यमांनी नवा बदल आणला आहे. समाज माध्यमे जशी प्रगत झाली तसे त्याचे धोके देखील आता दिसत आहेत. यात सर्वात मोठा धोका हा मानसिक आरोग्याला आहे.
आरोग्याचा आपण विचार करतो त्यावेळी आपणास शारिरीक आरोग्या सोबतच मानसिक आरोग्याचा देखील विचार करणे आवश्यक असते आणि नेमकेपणाने आपणास याचा विसर पडलेला दिसतो.
घरात चार जणांचे कुटुंब ही शहरीकरणातून नव्याने आलेली समस्या आहे. त्यातही काही कुटुंबात ३ जणच आहेत. अशीही स्थिती आहे. पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब पद्धती होती. त्यावेळी घरातला काळ हा संवादाचा काळ होता. त्यावेळी रेडिओ शिवाय मनोरंजनाचे दुसरे साधन नव्हते. नंतर टिव्हीचा शिरकाव झाला मग २४ तास वाहिन्यांनी मनोरंजनाचा रतिब सुरु केला. आज देशातील विविध भाषक टीव्ही वाहिन्यांची संख्या ११७१ इतकी आहे.
मनोरंजनासाठी वाहिन्या कमी पडताहेत आणि आपण तयार केलेल्या कलाकृतींना व्यासपीठ मिळत नाही. या भुमिकेतून ओव्हर द टॉप अर्थात OTT चा प्रसार वेगात झाला.
हे सर्व घडत असताना इंटरनेटचा प्रसार वाढला. ज्याला माहिती तंत्रज्ञानाचे युग आपण म्हणतो तसं युग अवतरले. यात फेसबूक, एक्स तसेच इन्ट्राग्राम सारख्या संवाद माध्यमांसोबत दुहेरी संवाद, चित्र संवाद आणि संदेश वहन सुरु झाल. यात ‘व्हॉटसअप’ ने प्रत्येक हातातला मोबाईलने मानसिक शांततेला पहिला धक्का दिला.
‘व्हॉटसअप’ हातोहाती पोहचलं, त्यासोबत त्याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर दिसायला लागला. नवी पिढी अर्थात जेन-झी (Gen-z ) ने याला झटपट स्विकारलं असलं तरी जुनी पिढी कुठेतरी अडखळताना दिसत होती.
यानंतर आलेल्या ‘रिल्स’ ने एक क्रांती घडवली व सोबत नव्या पिढीची मानसिक शांतता पूर्णपणे संपवली. त्यातच जुन्या पिढीला आता या रिल्सचं ‘व्यसन’ जडलय की काय असं आता वाटायला लागले आहे. एका घरातील ४ माणसं ४ मोबाईल आणि ४ स्वतंत्र विश्व एकाच छताखाली अशी स्थिती आली आहे.
या रिल्सच्या प्रभावाने मोठ्या प्रमाणावर नवी पिढी दोन प्रकारे स्वतःचं नुकसान करून घेताना दिसते. ‘रिल्स’ च्या नादात होणारे अपघाती मृत्यू हा स्वतंत्र असा विषय आहे. मात्र आपल्या उपस्थितीची दखल घेणं आपल्या कामाला दाद मिळणं या अपेक्षा वाढलेला नव्या पिढीत नैराश्य वाढत आहे आणि ही धोक्याची घंटा आहे.
हातात मोबाईल घेऊन रस्ता ओलांडणारे अनेक जण दुर्दैवाने अपघाती मृत्यूत प्राण गमावून बसले आहेत. या माध्यमाच्या वेडापायी स्वतःची तहान-भूक हरपून झोपही विसरणारे नकळत स्वत:च्या आरोग्यावर परिणाम करून घेत आहेत
२०१३ साली मी या विषयावर प्रथम लिहिलं, त्यावेळी म्हंटल होत की, आठवड्यातून किमान एक ‘मोबाईल हॉलीडे ‘ सर्वांनी पाळावा. आता तर स्थिती अशी आली आहे की ‘गॅझेट फ्री’ अवर्स (तास) दिवसात किती असावेत हे ठरवावं लागणार आहे. टीव्ही, मोबाईत हे सारं मिळून आपला ‘स्क्रीन टाईम’ किती मर्यादीत ठेवायचा याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
मोबाईल हे संदेशवहन आणि केवळ संदेशवहन इतके मर्यादीत राहिलेलं नाही. मात्र आजही अमेरिकेसारख्या महासत्ता असणाऱ्या देशात ‘पेजर’ चा वापर अधिक केला जातो हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. “मोबाईल माझ्यासाठी कि मी मोबाईलसाठी” हे ठरवावं लागणार आहे.
मोबाईलमधील कॉन्टेन्ट बघताना आपल्या मानसिक स्थितीत नेमकेपणाने काय बदल होतात याचा विचार होत नाही. ‘न्यूरोसायन्स’ च्या अभ्यासातून समोर आलं आहे की, आपल्या मेंदूत कृत्रिम लहरीतून आनंदाची अनुभूती देणारे ‘डोपामाइन’ असेल तर आपल्याला त्यात अधिक रस असतो, पण कृत्रिम डोपामाईन निर्मिती ही क्षणिक असते. काही झालं तरी ते पूर्णपणे आभासी विश्व आहे.
घरात कुटुंबासोबत होणारा अंवाद, मित्र-मैत्रीणीसोबत चर्चा करणे तसेच, प्रसंगी वाद-विवाद, आपल्या आसपासच्या निसर्गाचं आणि खऱ्या जगाचं भानं असणं म्हणजे खरा आनंद आहे. ‘रिल्स’ बघताना सोशल मीडिया साईटस् नकळत आपल्या आवडीचा वेध घेऊन त्याच पद्धतीच्या रिल्स सातत्याने आपणास दिसतील असे ‘अल्गोरिदम’ विकसित करून आपल्या मनाचा नकळत ताबा घेत आहे.
वय झाल म्हणून सांगत नाही पण रेडिओवर पुढचं गाणं कोणतं असेल याची अनिश्चितता आणि अपेक्षा व त्यातील आनंद वेगळा होता. १५ पैशांचं ख्यालीखुशाली कळवणारं “टपाल” पोस्टकार्ड जितका आनंद देत असे तितका आनंद या आभासी जगात निश्चित नाही.
या स्वागत आहे खऱ्या विश्वात… सोडा ते
