आपला जिल्हाताज्या घडामोडी

स्वामी रत्नमाला महारुद्र यांची केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली च्या ‘महाराष्ट्र राज्य संघटन सचिव’ पदी निवड

By अनिल जाधव

स्वामी रत्नमाला महारुद्र यांची केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली च्या ‘महाराष्ट्र राज्य संघटन सचिव’ पदी निवड

अहिल्यानगर : जिल्ह्यातील पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्त्याला राष्ट्रीय स्तरावर मोठे प्रतिनिधित्व बहाल करणारी व संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव करणारी ही वार्ता आहे. याबाबत सविस्तर असे कि, मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय आणि जनसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली ( Central Human Rights Organization, New Delhi ) च्या वतीने स्वामी रत्नमाला महारुद्र, रा. तिसगाव, पाथर्डी, जि. अहिल्यानगर यांची महाराष्ट्र राज्य संघटन सचिव या महत्त्वपूर्ण पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून सोबतच संगठनच्या दैनिक मुखपत्राचे क्राईम रिपोर्टर तसे अधिकृत नियुक्ती पत्र त्यांना,
केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहीवले यांच्या कडून (संदर्भ क्र. के.मा./नाग. ४५८२, दिनांक: ०८/०९/२०२६) देण्यात आले असून स्वामी रत्नमाला महारुद्र यांना सदस्यता / फेलोशिप क्रमांक ४५८२ प्रदान करण्यात आला आहे.

मानवाधिकार रक्षण आणि सामाजिक जागृतीचे मुख्य उद्दिष्ट
या नियुक्ती पत्राद्वारे संगठनने स्पष्ट केले आहे की, भारतीय संविधानातील मूल्ये, मूलभूत हक्क आणि मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी स्वामी रत्नमाला महारुद्र संपूर्ण महाराष्ट्रात उपरोक्त पदावर कार्य करतील. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक कल्याण, सांस्कृतिक विकास आणि जनहित या विविध क्षेत्रांत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे, तसेच पीडित व वंचित घटकांना न्याय मिळवून देणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असणार आहे.

संगठनच्या धोरणानुसार, महाराष्ट्रात संगठनचा विस्तार करणे, राज्य कार्यकारिणी बळकट करणे आणि निष्ठा व समर्पणाने जनसेवा करणे यावर त्यांनी भर देणे अपेक्षित आहे.
नागरिकांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी सदैव कटिबद्ध स्वामी रत्नमाला महारुद्र यांनी
आपल्या या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करताना,
> “केंद्रीय मानवाधिकार संगठनने माझ्यावर जो विश्वास दाखवून ही मोठी जबाबदारी दिली आहे, त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मिलिंद दहीवले व संपूर्ण केंद्रीय समितीचे मनापासून आभार व्यक्त करते असे उदगार काढले. आजच्या काळात मानवाधिकारांचे रक्षण करणे आणि संविधानाने दिलेले मूलभूत हक्क तळागाळातील माणसांपर्यंत पोचविणे अत्यंत गरजेचे असल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मानवाधिकार जागृती मोहिमा राबवून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करण्याची आंतरीक इच्छा त्यांनी व्यक्त केली.

तिसगाव (पाथर्डी) येथील रहिवासी असलेल्या स्वामी रत्नमाला यांची राज्यस्तरीय पदावर निवड झाल्याचे समजताच अहिल्यानगर जिल्हा व पाथर्डी तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??