आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी

व्हॉट शुड बी द लाईन ऑफ लाईफ शुड बी नोन टू अस् इज लाईफ! – डॉ. विजयकुमार कस्तुरे

By अनिल जाधव

व्हॉट शुड बी द लाईन ऑफ लाईफ शुड बी नोन टू अस् इज लाईफ! – डॉ. विजयकुमार कस्तुरे

कोची – शाहू, फूले, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरीत अन् – चलो बुध्द की ओर – तत्वाला धरून सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात मानवीय जाण व भान जोपासून सातत्याने घोडदौड करणाऱ्या – साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छ. संभाजी नगर च्या वतीने केरळ काव्य महोत्सव २०२६ निमित्ताने, प्रजासत्ताक दिवस – २०२६ च्या पर्वावर केरळ मधील अप्रतीम सृष्टी सौंदर्याने व चहा-कॉफी-मसाल्यांच्या वनश्रीने नटलेल्या जागतिक दर्जाच्या ऐतिहासिक कोची शहरातील आलीशान ‘ किंग्ज एम्पायर ‘ हॉटेलच्या भव्य सभागृहामध्ये आयोजित बहुभाषिक राष्ट्रीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत असतांना अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त कवी तथा अखंड सामाजिक कार्यासाठी साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापिठातर्फे मानद डॉक्टरेट तसेच ऐतिहासिक बुध्द भूमी, देहू रोड घ्या वतीने भीम रत्न पुरस्काराने सन्मानित ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी वरील प्रमाणे विधान करून आजच्या तरूण पिढीला बाबासाहेबांचा दिशादर्शक संदेश दिला. सोबतच –

रे माणसा आता तर माणूस हो जरासा !

आपल्याच वागण्याचा कर तू जरा खुलासा…..!!

या कविते मधून संवैधानिक मानवीय मुल्यांकन सांगत,

‘ मॅटर पॅटर केअरफुली

हीअर व्हॉट इज सेड,

व्हॉट इज सेड !

सेव्ह दि डॉटर 

सेव्ह दि डॉटर,

मेक हर एज्यूकेटेड…..!!

आणि,

द्या दवंडी गावांत,

मला मुलगी झाली !

साऱ्या जगाची दौलतं

माह्या वटीत आली…..!!

या काव्य गीतांमधून बेटी बचाओ बेटी पढाओ चा बहूमोलाचा ज्वलंत मंत्र देतानाच…..

आजादी हिंदुस्थानकी,

होगयी पाऊनसौ सालकी !

जिसके लिये शहीदोने अपनी,

बली चढायी जान की…..!!

या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी हिंदी गीतामधून राष्ट्रभक्ती ची प्रेरणा देत देशाच्या स्वातंत्र्य व रक्षणासाठी आपल्या जीवाचे बलीदान करणाऱ्या सर्व शहीदांना आंतरीक मानवंदना देवून पुढे—

— बनामे दर्द एहसाने मसीहा हम नहीं लेंगे !

जिगरपे जखम तो लेंगे,

मरहम नहीं लेंगे !

और मानाके शेख साहब,

हम पीते नहीं लेकीन

गर आये है सरे महेफिल,

तो हिस्सा कम नहीं लेंगे !!

या सारख्या उर्दू शेरोशायरी द्वारे राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावाची व नागरी कर्तव्याची जणू हाकंच नागरिकांना देवून भावनिक आवाहन करीत उपस्थित साहित्यिक मान्यवरांसह रसिक प्रेक्षकांना अंतर्मुख केले. तसेच,

शाहू राजा, शाहू राजा, शाहू राजा…..

मायबापा…..

वंचितांची वंदना पायी तुझ्या…..रे…..

या कविता गायनाने आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या मानवीय कार्याची जाणीव करून दिली.

तर या संमेलनाचे प्रमुख अतिथी या नात्याने वैशिष्ट्यपूर्ण व परकायाप्रवेशी कथाकथनास्तव सातासमुद्रापार ची मानद डॉक्टरेट प्राप्त कथाकार व ज्येष्ठ कवी डॉ. बबनराव महामुने, छ. संभाजी नगर यांनी मराठवाड्यातील मोगलाई च्या प्रादेशिक बोलीभाषेतील त्यांच्या गाजलेल्या उलगडा या कथेने आणि भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव या मनाचा ठाव घेणाऱ्या कवितेने सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. प्रमुख पाहुणे आयुष्मान गुणवंत राव गवई यांनी आपल्या भाषण व काव्यामधून फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मांडले. तसेच निमंत्रित परंतु मुलीच्या पीएच्. डी. संदर्भातील प्रासंगिक कारणास्तव या सोहळ्यास उपस्थित न राहू शकलेल्या ज्येष्ठ कवी डॉ. डी. व्ही. खरात, बुलढाणा यांनी पाठविलेल्या शुभेच्छा व कवितेच्या ऑडीओ क्लिपचे प्रसारण करण्यात आले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या बहुभाषिक राष्ट्रीय साहित्य संमेलनात साहित्यधारा संस्थेतर्फे आयु. सूर्यकांत तेलगोटे, अकोट, जि. अकोला, ह.मु. छ. संभाजी नगर, आयु. पालवे, पुणे, आयु. मिसाळ, छ. संभाजी नगर आणि आयु. आदर्श खोसरे, पुणे या मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रातील सेवाकार्यास्तव साहित्य धाराच्या राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार त्यांना, संस्थेचे अध्यक्ष तथा स्कॉटलॅंडयार्ड स्टुडंट्स ब्रॅण्ड एम्बेसेडर व ज्यांचे पस्तीस ते चाळीस अर्थशास्त्रीय प्रबंध अंतर्राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित असून विविध राज्य तथा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असलेले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या डॉ. प्रा. संघर्ष सावळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी कवयित्री आयुष्मती सौ. गवई, आयुष्मती पंचफुला बाई बनकर व इतर कवींनी आपल्या काव्यरचनेतून राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई तसेच महापुरूषांच्या कार्याचा संदेश दिला.

तर पुरस्कारनिमित्ताने मा. तेलगोटे यांच्यासह इतर मान्यवर पुरस्कारार्थींनी

सुध्दा संस्थेच्या संवैधानिक, साहित्यिक व सामाजिक कार्यास व चळवळीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. हा संमेलन सोहळा पूर्वनियोजित दि. २६-०१-२०२६ व मुन्नार येथील जंगल रिसॉर्ट ऐवजी तांत्रिक कारणास्तव दि. २९-०१-२०२६ रोजी कोची, केरळ येथे सुप्रसिध्द किंग्ज एम्पायर हॉटेलच्या भव्य व सुशोभित सभागृहामध्ये संपन्न झाला. तसेच आकस्मिक कालवश उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याप्रसंगी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व भूमिका निवेदन

संस्थेचे अध्यक्ष डॉ. सावळे यांनी तर आभार प्रदर्शन आयुष्मती अभिनिता सावळे यांनी केले. सदर संमेलनात महाराष्ट्र केरळ सह विविध राज्य व स्थळावरून आलेले मान्यवर उपस्थित होते.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??