आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा लढा सुरूच: पारध येथील शेतकरी तिसऱ्यांदा कागदपत्रे जमा करूनही अनुदानापासून वंचित

By तेजराव दांडगे/कृष्णा लोखंडे

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा लढा सुरूच: पारध येथील शेतकरी तिसऱ्यांदा कागदपत्रे जमा करूनही अनुदानापासून वंचित

भोकरदन, [२९ मे २०२५] – भोकरदन तालुक्यातील पारध येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानासाठीचा संघर्ष थांबता थांबेना. फेब्रुवारी ते मार्च २०२४ दरम्यान झालेल्या गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान होऊनही अनेक शेतकरी अजूनही भरपाईपासून वंचित आहेत. प्रशासनाच्या कथित हलगर्जीपणामुळे न्याय मिळत नसल्याने, आज पुन्हा एकदा संतप्त शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात धाव घेऊन तलाठी अमोल तळेकर यांच्याकडे तिसऱ्यांदा कागदपत्रे जमा केली.

गारपिटीने पारध येथील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. उभी पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानीचा मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांच्याकडे दोन वेळा कागदपत्रे जमा केली होती. मात्र, कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आज तिसऱ्यांदा आपल्या बँक पासबुकची झेरॉक्स आणि आधार कार्डची प्रत जमा केली.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “पारध येथे २०२४ मध्ये फेब्रुवारी ते मार्च महिन्यात झालेल्या गारपीटमुळे मोठे नुकसान झालेले अनेक शेतकरी भरपाईपासून अजूनही वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांचे आज आम्ही बँक पासबुक व आधार कार्ड हे तलाठी साहेबांना तिसऱ्यांदा दिले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे गारपिटीचे अनुदान रखडले असल्याने त्यांना पेरणीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी बँकांकडून किंवा सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे.”

सागर देशमुख यांनी पुढे प्रशासनाला इशारा देत म्हटले, “गारपीटग्रस्त वंचित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा दिवसांमध्ये जर अनुदान जमा झाले नाही, तर तलाठी कार्यालयात उपोषण करण्यात येईल.”

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे अमोल श्रीवास्तव, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते दिलीप बेराड, भारतीय युवा मोर्चाचे पवन लोखंडे, ज्ञानेश्वर मोरे, सागर श्रीवास्तव, चेतन देशमुख, पांडुरंग लोखंडे, विकास लोखंडे,राजू बोराडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आता शासनाने यावर लवकर दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे.

Tejrao Dandge

तेजराव दांडगे यांनी महा डिजिटल मीडिया असोसिएशनचा बी ग्रेड मिळवत ऑनलाइन डिजिटल पत्रकारिता अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे, याबद्दल MDMA च्या वतीने त्यांना प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा मागील आठ वर्षांपासून सक्रिय सहभाग आहे. तेजराव दांडगे यांनी बी.ए. पदवी शिक्षण पूर्ण केले असून, जालना येथे जिल्हाधिकारी मा. श्री. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात एमसीईडी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी कॉम्पुटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. यासोबतच, ते महावितरण कंपनीमध्ये प्रभुलीला एजन्सीच्या माध्यमातून मीटर वाचनाचे अर्धवेळ काम करतात. त्यांचे स्वतःचे आरोही झेरॉक्स सेंटर असून त्याद्वारे ते ऑनलाइन स्वरूपाची कामे देखील करतात. डिजिटल मीडिया क्षेत्रात तेजराव दांडगे सक्रियपणे कार्यरत असून, आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??