पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे चालू झाले.
जिल्ह्यासह हवेली गावागावांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चांगले वेध लागले आहेत. आमदारकीचे आधीची पूर्व परिक्षा राजकीय ताकद दाखवणारी गावा भावाच्या राजकीय डावपेचातुन रंगाची निवडणूक म्हणून पाहिले जाते. त्या अनुषंगाने सर्वत्र पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्यात शह काटशहाचे अंदाज वर्तवीले जाऊ लागले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार? हे अद्याप स्पष्ट नसले, तरी स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्यात चर्चा रंगू लागली.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत आपापल्या पक्षाचे निष्ठेने काम केल्याचा मोबदला म्हणून अनेक कार्यकर्त्यांना आता झेडपी व पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. राज्यातील एकूणच राजकीय वातावरण पाहता लवकरच घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकार म्हणतात. त्यासाठी इच्छुक आतापासूनच गुडग्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
हवेली तालुक्यातील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा मोठा फटका तालुक्याला बसला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही किती गटात होणार याचे गणित महायुती सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जुन्या गटांनुसार अंदाज बांधून नवीन गट रचनेनुसार आपले ‘स्थानिक’चे राजकीय फासे फेकताना दिसत आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार, जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गण वाढणार की कमी होणार?
जुन्या का नव्या गटानुसार ठरणार..
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेसाठी ८२, तर पंचायत समित्यांसाठी एकूण १६४ गण निश्चित केले होते. यामुळे जिल्हा परिषदेचे नवीन ७ गट आणि पंचायत समित्यांचे नवीन १४ गण वाढले होते. हवेली तालुक्यातील तब्बल ७ गट आणि १४ गणांवर संक्रांत आली होती. नवीन रचनेत हवेली तालुक्यात आता केवळ ६ गट आणि १२ गण निश्चित झाले
कोणाला बसणार फटका
अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या असून सध्या प्रशासकराज सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील अगोदर असलेल्या सदस्यांचे राजकीय वजन कमी झाले. तेथील राजकीय समीकरणे देखील बदलून गेल्यामुळे प्रस्थापितांना पुन्हा नव्याने तेथे जम बसविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
राजकीय पक्षांची तारेवरची कसरत..
२०२२ मध्ये शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. त्यानुसार जिल्ह्यासह, तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटांत विभागणी होऊन कार्यकर्ते विभागले गेले आहेत. अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने समीकरणे बदलली आहेत. सोबतच प्रत्येक पक्षांची मतपेढी देखील बदललेली असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा या निवडणुकीत कस लागणार यात शंका नाही.
या निवडणुकीत कोणाला तिकीट मिळणार, कोणाचे तिकीट कापणार, कोण पक्ष बदलणार, मतदार कोणावर विश्वास ठेवणार हा येणारा काळ ठरवेल ….
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??