आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी
शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा; महेंद्र बेराड यांचे नायब तहसीलदारांना निवेदन
By देवानंद बोर्डे

शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा; महेंद्र बेराड यांचे नायब तहसीलदारांना निवेदन
पारध/पिंपळगाव रेणुकाई: येथील महसूल समाधान शिबिराच्या औचित्याने सामाजिक कार्यकर्ते महेंद्र संपत बेराड यांनी भोकरदनच्या नायब तहसीलदारांची भेट घेऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला. पारध आणि पिंपळगाव रेणुकाई सर्कल मधील ८ गावांतील शेतकऱ्यांना शेतरस्ते नसल्याने पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
या भागात भाजीपाला आणि दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते, मात्र रस्त्यांच्या अभावामुळे माल बाजारात नेणे कठीण होते. प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे पांदण रस्ते मोकळे करून द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.



