महाराष्ट्र

खानपान ही विशिष्ट जातीधर्म प्रदेशाशी निगडित गोष्ट नसून मानवाची संस्कृती ; सोहेल हाश्मी…

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

पुणे : विशिष्ट खाणं हे विशिष्ट जातधर्माशी जोडून त्याविरोधात प्रचार केला जातो. त्यातून शुद्ध खाणं आणि शाकाहार याचा प्रचारही केला जातो. मात्र खानपान ही मानवाची संस्कृती आहे, संस्कृती प्रवाही होती, आहे आणि पुढेही राहील, ती प्रवाही असणं हे मानवाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे.

          आज बहुराष्ट्रीय कंपन्या भुकेचा धंदा करून बी. टी. बियाणांचा व्यवसाय करत असून त्या जे ताटात वाढतील ते (विष) खावं लागणार आहे, हा धोका ओळखून वेळीच जागं होत खानपान ही संस्कृती टिकवून ठेवणं आपल्याच हातात आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, फिल्म मेकर सोहेल हाश्मी यांनी केले. लोकायत, ज्ञानभरती, अलर्ट आणि राजीव गांधी स्मारक निधी आयोजित भारत एक खोज व्याख्यानमालेत दुसरे व्याख्यान भारत के स्वाद अंतर्गत बोलत होते.

          ते बोलताना पुढं म्हणाले की उत्तर भारतीयांचं खाणं म्हणजे भारतीय खाणं हे पसरवलं जात आहे, पण काय तामिळनाडू, केरळ, ईशान्यपूर्वीकडील राज्य ही भारतीय नाहीत? का त्यांचं खाणं भारतीय खाणं नाही? या प्रश्नावर आपल्याला विचार करावा लागेल. ईशान्यपूर्वेकडील राज्यांचं खाणं चायनीज म्हणून विकलं जात आहे. कोणत्याही भाज्या-पालेभाज्या आणि हाडं खाता येतील अशी निसर्गाने मानवाच्या दातांची रचना केलेली आहे, कारण माणूस मूलतः मांसाहार करत होता. शुद्ध शाकाहार असं काही नाही. पनीर, तूप यासारखे पदार्थ प्राणिज पदार्थ आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज प्रश्न शाकाहार का मांसाहार हा नसून बहुराष्ट्रीय कंपन्या भारतासारख्या देशातली खाण्यातली विविधता समूळ नष्ट करून बी.टी. बियाणांचा धंदा करत आहेत, ज्यामुळे खाण्यातली विविधता नष्ट होण्याबरोबर शेतकरी देशोधडीला लागत आहे, आपल्या ताटात विष वाढलं जात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, तरच मानवाची म्हणून असलेली खाण्यापिण्यातली विविधता संस्कृती टिकवता येईल.

         व्याख्यानमालेमागचा उद्देश असणारं प्रास्ताविक लोकायतचे समन्वयक नीरज जैन यांनी मांडलं तर सूत्रसंचालन रुषल हिना यांनी केलं. यावेळी ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानाला उपस्थितांनी केकचा आस्वाद घेतला.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??