आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी

जालना: ‘शिक्षण’ की ‘शिकस्ती’? पारध जिल्हा परिषद शाळेची दैना

By तेजराव दांडगे

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

जालना: ‘शिक्षण’ की ‘शिकस्ती’? पारध जिल्हा परिषद शाळेची दैना

पारध, दि. 26: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. काल रात्रीच्या पहिल्याच पावसानं शाळेचं प्रांगण अक्षरशः तलावात रूपांतरित झालं आहे. आणि गंमत म्हणजे, या नवनिर्मित तलावात बेडकांनी ‘डराव डराव’ भजनाचा अखंड जागर सुरू केला आहे, ज्याचा लाईव्ह अनुभव वर्गात बसलेली चिमुकली विद्यार्थी घेत असल्याचं चित्र आहे.

पोषण आहाराचं ‘ओलं’ वास्तव!
एकिकडे शाळेच्या आवारात पाण्याचा डोह साचला असताना, दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी ‘गरमागरम’ शालेय पोषण आहार जिथे बनवला जातो, त्या किचनची अवस्था तर त्याहून भयंकर आहे. छतावरील चार-पाच पत्रे पूर्णपणे निकामी झाले असून, तीन-चार फुटांचे तुकडे पडले आहेत. रात्रीच्या पावसानं संपूर्ण खोली पाण्यानं भिजून गेली आहे. ‘अशा परिस्थितीत पोरांसाठी जेवण बनवणं म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखंच आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीने शाळेला कंपाउंड करून मुरूम टाकला खरा, पण शाळेचा परिसर सखल असल्यामुळे आणि पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने, पहिल्याच पावसात ही ‘जलक्रीडा’ समोर आली आहे. शाळेसमोरील रस्त्याचीही दैना उडाल्याने, पारध जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न आता ‘मथळ्यावर’ नाही तर थेट ‘ऐरणीवर’ आला आहे.

सरकारचा उद्देश सर्वांना समान आणि दर्जेदार शिक्षण देण्याचा आहे. पण जर शाळेचीच अशी अवस्था असेल, तर ‘प्रगती’ करायची कशी, हा प्रश्न आता विचारला जात आहे.

दिला आंदोलनाचा इशारा
या गंभीर स्थितीवर येत्या चार-पाच दिवसांत तोडगा काढला नाही आणि शाळेतील साचलेले पाणी व पोषण आहार कक्षाची दुरवस्था तात्काळ दूर न केल्यास, सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख यांनी थेट शाळेतच उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आता वरिष्ठ अधिकारी आणि गावचे राजकीय धुरंधर एकत्र येऊन या ‘जलबंबाळ’ समस्येवर काय तोडगा काढतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??