आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी

ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या विचारांनी मानवाचा उद्धार: विष्णू महाराज सास्ते

पारध नगरीत २५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; सास्ते महाराजांचे विचारमंथन

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या विचारांनी मानवाचा उद्धार: विष्णू महाराज सास्ते

पारध नगरीत २५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; सास्ते महाराजांचे विचारमंथन

पारध, दि. ११: भोकरदन तालुक्यातील पारध बु येथील २५ व्या अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वर पारायण सोहळा आणि श्रीमद् भागवत कथेची नुकतीच सांगता झाली. यानिमित्त रात्रीच्या सेवेत ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते यांनी आपले विचार मांडले.

महाराज म्हणाले की, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे विचार मानवी जीवनाला तारून नेतात. मानवाला नेहमीच सद्बुद्धीची गरज असते, कारण तीच त्याच्या उद्धाराला कारणीभूत ठरते. त्यामुळे, संतांनी नेहमीच परमेश्वराकडे प्रार्थना केली की, आपल्या मनात कधीही दुर्बुद्धी येऊ नये आणि भगवंताचे नाम सदैव स्थिर राहावे. जीवनात एकदा परमार्थिक भाव निर्माण झाला की, तो भगवंताच्या कृपेने पूर्णत्वाला जातो, आणि हाच खरा मोठा लाभ आहे, असे चिंतन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी एकत्रीकरण आणि संघटनेचे महत्त्वही सांगितले. श्रावण मासातील रक्षाबंधन या सणाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, हा सण भारतीय संस्कृतीतील बहिण-भावाच्या नात्याचे प्रतीक आहे, जिथे बहिण आपल्या रक्षणाची जबाबदारी भावावर सोपवते.

महर्षी पराशर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या नगरीत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या अधिष्ठानाखाली हा अखंड सप्ताह यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी समस्त गावकरी आणि उपस्थित महाराज मंडळींचे अभिनंदन केले.

Tejrao Dandge

तेजराव दांडगे यांनी महा डिजिटल मीडिया असोसिएशनचा बी ग्रेड मिळवत ऑनलाइन डिजिटल पत्रकारिता अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे, याबद्दल MDMA च्या वतीने त्यांना प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा मागील आठ वर्षांपासून सक्रिय सहभाग आहे. तेजराव दांडगे यांनी बी.ए. पदवी शिक्षण पूर्ण केले असून, जालना येथे जिल्हाधिकारी मा. श्री. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात एमसीईडी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी कॉम्पुटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. यासोबतच, ते महावितरण कंपनीमध्ये प्रभुलीला एजन्सीच्या माध्यमातून मीटर वाचनाचे अर्धवेळ काम करतात. त्यांचे स्वतःचे आरोही झेरॉक्स सेंटर असून त्याद्वारे ते ऑनलाइन स्वरूपाची कामे देखील करतात. डिजिटल मीडिया क्षेत्रात तेजराव दांडगे सक्रियपणे कार्यरत असून, आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??