आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी

भोकरदन: ‘हलगर्जीपणा’ नडला! पारध गावातील सुमारे २०० शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित; तातडीने मदत देण्याची मागणी

By गौतम वाघ

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

भोकरदन: ‘हलगर्जीपणा’ नडला! पारध गावातील सुमारे २०० शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित; तातडीने मदत देण्याची मागणी

जालना/प्रतिनिधी: जालन्यातील भोकरदन तालुक्यामध्ये पारध गावातील जवळपास दोनशेहून अधिक शेतकरी अजूनही 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी (गारपीट) अनुदानापासून वंचित आहेत. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या कथित हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची ही मदत थांबल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी कागदपत्रे जमा करूनही त्यांच्या खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.

वारंवार कागदपत्रे देऊनही मदत नाही
पारध येथील संतप्त शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अनुदानासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे दोन वेळा ग्रामसेवक यांच्याकडे जमा केली आहेत. या कागदपत्रांचा पाठपुरावा करूनही प्रशासकीय स्तरावर दिरंगाई झाली आहे.

या वंचित शेतकऱ्यांपैकी काही जणांचे विके (Vake) नंबर तयार झाले आहेत, तर अनेकांचे नाव नुकसान भरपाईच्या यादीतच समाविष्ट झालेले नाही. यामुळे त्यांची केवायसी (KYC) प्रक्रियाही पूर्ण होऊ शकलेली नाही.

सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचा संताप
सागर देशमुख (सामाजिक कार्यकर्ते) यांनी या गंभीर प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “पारध येथील जवळपास २०० शेतकऱ्यांचे गारपीट अनुदान अजून आलेले नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे विके नंबर तयार असूनही पैसे जमा झालेले नाहीत, तर अनेक शेतकऱ्यांची यादीत नाव नसल्यामुळे केवायसी पेंडिंग आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करावे.”

शेतकऱ्याचा अनुभव:
या नुकसानीचा फटका बसलेल्या सुदर्शन लोखंडे या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. “मी माझ्या शेतात हरभऱ्याची लागवड केली होती. गारपीट झाल्यामुळे मला शेतातून एक रुपयाचेही उत्पन्न मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले, पण मला अजूनही मदत मिळाली नाहीये,” असे ते म्हणाले. लोखंडे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून तलाठी, कृषी सहाय्यक आणि तहसील कार्यालयात कागदपत्रांचा सतत पाठपुरावा केला आहे. “माझी केवायसी होऊन जवळपास सहा महिने झाले आहेत, तरीही मला गारपिटीचा अनुदान जमा झालेला नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मागणी:
जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, स्थानिक तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करावी आणि वंचित राहिलेल्या पारध गावातील २०० हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??