लाडक्या बहिणीचा अर्ज बाद पण; सरसकट नाही म्हणत अदिती तटकरेंनी टाकला बॉम्ब..
मुंबई : लाडकी बहीण योजनेचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळं आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचंही बोललं जात आहे. आणि अखेर नियमावली आली समोर.
या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
कॅबिनेटच्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अर्जांची आता पडताळणी होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तसंच शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. अर्ज सरसकट बाद होणार नाहीत पण ज्यांच्या घरामध्ये दुचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आधारकार्डची माहिती जुळत नसेल किंवा नोकरीला असलेल्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
मिलिंद म्हैसकर यांना महसूल, विकासचंद्र रस्तोगी यांना कृषी तर आठवडय़ापूर्वीच बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावर पाठवण्यात आलेले हर्षदीप कांबळे यांना पुन्हा बदलीने सामाजिक न्याय विभागात पाठवण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांत जवळपास 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पुन्हा महत्त्वाच्या विभागांमध्ये आणण्यास सुरुवात केली आहे. फडणवीसांच्या मर्जीतले समजले जाणारे मिलिंद म्हैसकर यांना महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव बनवण्यात आले आहे. तर त्या ठिकाणी असलेले बी. वेणुगोपाल रेड्डी यांची बदली उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे.
महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी करण्यात आली असून त्यांच्याकडे पर्यटन विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही राहणार आहे.
कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंघल यांची पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे तर शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांची बदली कामगार विभागाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. रुसाचे प्रकल्प संचालक डॉ. निपुण विनायक यांची बदली आरोग्य विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे, तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना कृषी विभागाचे प्रधान सचिव तर हर्षदीप कांबळे यांना सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. एच. एस. सोनवणे यांना क्रीडा व युवक कल्याण विभागाचे आयुक्त बनवण्यात आले आहे.
पूजा खेडकर प्रकरणात चर्चेत आलेले सुहास दिवसे यांना पदोन्नती
साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे पूजा खेडकर प्रकरणात चर्चेत आलेले पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची पदोन्नतीने बदली करून त्यांना भूमी अभिलेख विभागाचे जमाबंदी आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत.